Home News उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा : आमदार सतेज पाटील

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा : आमदार सतेज पाटील

0 second read
0
0
13

कोल्हापूर:जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. स्थानिक पातळीवरील समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, तर राज्य पातळीवरील समस्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल एमआयडीसी, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले आणि शिरोळ येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योजकांना शासन स्तरावर काही अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत औदयोगिक संघटना उद्योजक, आमदार व शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन, उद्यमनगर येथे पार पडली. आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये उद्योजकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल, आयआयएफचे चेअरमन सचिन शिरगावकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील एफएसआय, एल. बी.टी., बी टेन्यूअर, रुपांतरीत कर, ग्रामपंचायत कर तसचं भूमिगत विज वाहिन्या त्याचबरोबर कामगारांसाठी असलेली ई एस. आय. हॉस्पिटल सुविधा, पर्यावरण विषयक बाबी आणि उद्योग क्षेत्रातील अडचणी अशा विविध विषयावर चर्चा करून उद्योजकांचे प्रश्न समजावून घेण्यात आलेत. या प्रत्येक विषयावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत क्षेत्रातील उद्योजकाकडून आकारण्यात येणाऱ्या करामध्ये सुसूत्रता आणण्याच्या सूचनाही या बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी केल्या.मालवाहतूक सोयीस्कर होण्यासाठी रस्ते, अवजड वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, औद्योगिक वसाहती मधील कचऱ्याचा उठाव , वीज वितरण व्यवस्था आदी मुद्द्यांचा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन विविध सूचना केल्या. बैठकीला उद्योजक संजय पेंडसे, मोहन पंडितराव, दीपक पाटील, सचिन शिरगावकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप भाई कापडिया, संगीता नलवडे, हिंदूराव कामते, एम वाय पाटील, अरुण जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार शितल मुळे भामरे, शिल्पा ठोकडे, शरद पाटील, कल्पना ढवळे, राहुल भिंगारे प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, मंजुषा चव्हाण ( डीआयसी व्यवस्थापक ), प्रमोद माने ( उपप्रादेशीक अधिकारी प्रदुषण )अंकुर कावळे अधीक्षक अभियंता महावितरण, सहायक आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर एस महाजन, सुदाम जाधव अधिक्षक भूमिअभिलेख,जगन्नाथ साळोखे ( एमपीसीबी), ईएसआय चे हेमंत यादव, सागर पाटील (सहायक पोलीस निरीक्षक ) प्रणाली पवार ( पोलीस उपनिरीक्षक )आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…