
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खंड पडला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री यांनी पुन्हा सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले आहे. गेल्या सहा महिन्यात शिवसेनेचे कोल्हापुरात झालेले सर्व कार्यक्रम शिवसैनिकांनी यशस्वी केले आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. दि.१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार असून, दि.१७ फेब्रुवारी रोजी शिवसंवाद मेळाव्या अंतर्गत मुख्यमंत्री यांची जाहीर सभा पार पडणार आहे. याकरिता देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात निर्माण करण्याची संधी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मिळाली आहे. या महाअधिवेशनावर शिवसेनेचे देशातील व राज्यातील भवितव्य अवलंबून असणार असून शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन व आढावा बैठक राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनेचे महाअधिवेशन पार पाडायची जबाबदारी कोल्हापूरच्या शिवसैनिकांवर दिली आहे. ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्व कार्यक्रम यशस्वी होतात, असा विश्वास असून, त्यांच्या हा विश्वास महाअधिवेशन आणि सभा यशस्वी करून अधिक दृढ करू. कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून सुमारे २० हजार शिवसैनिक, कार्यकर्ते सभा स्थळी नेण्याची जबाबदारी स्विकारली असून, ती पूर्ण करून दाखवूया, असे आवाहन केले.
. कोल्हापुरातील या राष्ट्रीय अधिवेशन आणि शिवसंवाद मेळाव्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. कोल्हापुरात होणारा आगामी कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमांना तोडीस तोड असा झाला पाहिजे आणि याचा परिणाम राज्याच्या राजकीय क्षेत्रात उमटला पाहिजे. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी करावे.
दि.१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये दि.१५ रोजी देशभरातील व राज्यातील शिवसेना नेते, मंत्री, प्रवक्ते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यापासून तळागाळातील पदाधिकारी यांची नोंदणी केली जाणार आहे. दि.१६ सकाळी व दुपारी आणि दि.१७ रोजी सकाळी अशा तीन सत्रात महाअधिवेशन होणार आहे. यानंतर दि.१७ रोजी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची जाहीर सभा देखील होणार आहे. मा.मुख्यमंत्री महोदयांची गेल्यावर्षी तपोवन मैदानात झालेली सभा रेकॉर्ड ब्रेक करणारी होती. त्याचप्रमाणे दि.१७ रोजी होणारी सभा तोडीसतोड अशी असावी. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना दिल्या.
यावेळी महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.